Monday 31 August 2020

वेड्या रविवारची कहाणी

 

मै और मेरी तनहाई 

लॉक डाऊन ची मरगळ जरा कमी होतेय. आम्हाला  रिकामपणचे उद्योग सुरु करण्याचे वेध लागतायत. एकदा तो करोना हद्द पार झाला की कुठे कुठे ट्रेकिंग ला जायचं या बद्दल गप्पा झडतायत. आणि माझी मात्र सायकलिंगची ओढ अनावर होतेय. मी सगळ्यांना सारखी समजावते की सद्य परिस्थितीत सायकल प्रवास हाच सर्वोत्तम पर्याय आहे.

आमच्या सायकल वाऱ्या सुरु झाल्या देखील. मग दर शनिवारी पुण्याच्या सर्व दिशा धुंडाळून होतात. मागचा रविवार मात्र थोडा वेगळा.

अनिरुद्ध आणि हेमंत बरोबर ठरलेले सर्व बेत ऐनवेळी रद्द होतात पण माझे हट्टी मन अजिबात माघार घेऊ इच्छित नाही.  मी उद्या एकटीच सायकलिंगला जाणार असल्याची घोषणा करते. इतक्या वर्षाच्या अनुभवाने चंदनने माझ्या नादी लागणे सोडून दिलेय त्यामुळे तो मूक पाठींबा दर्शवतो.

२०१४ साल पर्यंत केलेल्या सोलो सायकलिंग चा अनुभव गाठीशी असतोच.  रविवारी सकाळी ५.३० वाजता मी सायकल वर saddle bag लावते आणि मार्गस्थ होते. निर्मनुष्य रस्त्यावरून दोन चाके संथ गतीने धावू लागतात आणि माझे मन मात्र वायू वेगाने पुढे धावू लागते. 

वाघोलीचा वाघेश्वर

    आता माझा माझ्याशी संवाद सुरु होतो. सोलो सायकलिंगचा हा     पहिला एक तास मला खूप आवडतो. या तासात आधी मन        संभ्रमित असतं. थोडी हुरहूर असते. त्या एकटेपणाची अजून        सवय होत असते. थोडी मजा वाटते आणि ग्रुप सायकलिंगची        धमाल आठवून जरा कससही वाटते.  यातच कुठे तरी आपला        आपल्याशी संवाद सुरु होतो. विचारांचा गुंता सुटायला लागतो        आणि आपल्या विचारांना आपल्या मनात शिरायला जरा वाव        मिळू लागतो.

“अरेच्चा इतके काही वाईट नाही आपले मन. बरे आहे की. जमतंय की आपल्याला थोडा अंतरंगाशी संवाद साधायला.” असे म्हणे म्हणे पर्यंत वाघोलीच्या वाघेश्वर मंदिरा पर्यंत मी पोचते देखील. आज फोटो काढायला कोणी नाही मग मी मोबाईल काढून त्यात एक सेल्फी क्लिक करून टाकते. वर एक व्हिडीओ पण शूट करते.  प्रूफ हवेच हो सगळ्याचे. माझी black beauty आपली गप गुमान उभी. 

रस्ता अगदी सरळ सोट आणि माझा उत्साह शिगेला पोचलेला त्या मुळे वडू फाटा येतो देखील. आत वळल्यावर मात्र न

Black Beauty

राहवून मी एका हाताने handle धरून  दुसर्या हाताने मोबाईल मध्ये व्हिडिओ घेते. मेरा भारत महान वगैरे घिसे पिटे संवाद बरळून झाल्यावर माझे समाधान होते. आज असले अघोरी प्रकार करण्या पासून थांबवायला चंदन नाही. पण त्याला आठवून मीच हे चाळे बंद करते. इतक्यात एक माणूस दिसतो. बऱ्याच वेळात कुणाशी बोलता आलं नाही म्हणून की काय, मी त्याला विचारते, वडू चा रस्ता हाच का हो भाऊ? भाऊ साहेब मला उत्साहानी माहिती देतात, या बाजूला वडू खुर्द, आणि त्या बाजूला  बुद्रुक. तुम्हाला कुठे जायचंय. मी प्रांजळ पणे सांगते, तसं काही नाही, कुठलंही चालतंय की. भाऊ साहेब shocks and अश्विनी rocks. पण मी तरी काय करू. माझ खरच काही ठरलेलं नसत त्या वेळी. मग मी ठरवते आधी खुर्द आणि मग बुद्रुक.

त्या टुमदार गावाचा रस्ता नदीच्या घाटा पाशी संपतो. मग माझे पुन्हा एकदा मोबाईल मध्ये बरळून होते. दात काढून सेल्फी होतो. पोटपूजा होते, सायकल चे फोटो काढून होतात तरी भरपूर वेळ उरतो.  मग मी उगाचच त्या संथ वाहणा-या भीमा माई कडे बघत बसते. याच तीरावर, कधी तरी छत्रपती संभाजी महाराज वावरले असतील अशा विचारांनी मन भरून येते.

त्या निर्मनुष्य घाटावरून मन निघत नाही आणि पाय थांबत नाहीत. तेव्हढ्यात घरी फोन करायचा होता याची आठवण होते. पटकन एका वाक्यात मी कुठे आहे हे सांगून फोन बंद. त्या निरव शांततेत इतकेही बोलण्याची इच्छाच होत नाही.

परत हमरस्त्याला लागल्यावर अचानक संभाजी महाराजांच्या समाधी कडे अशी पाटी दिसते आणि मी बुद्रुक वगैरे विसरून मातीच्या रस्त्याला लागते. शेताच्या कडे कडेनी हा नयनरम्य रस्ता मला परत नदी काठी घेऊन जातो. आणि पाहाते तर काय एक प्राचीन कठडे विरहित पूल समोर उभा ठाकतो. त्या ब्रिज वर सायकल दामटवून पलीकडच्या तीराला लागते सुधा. त्यात मोबाईल वरून एक व्हिडीओ काढण्याचा अचरटपणा करून होतोच.



            
माझा पण फोटू
    
    नदीचा धीरगंभीर आवाज माझ्या चंचल मनाला आवर घालतो. थोडा वेळ मन स्थिर झाल्यावर त्या     अनाम स्थळावरून मी गाशा गुंडाळते. Finally कोरेगाव भीमा येत आणि मी नगरच्या दिशेने         सायकल हाकू लागते. आता मला केळी दिसतात. मग उगाचच थांबून केळी घेते. केळ हे             निमित्त मात्र, खर तर माणसाशी बोलायची ओढ. मग दादाला उगाचच पुढचे गाव किती दूर आहे      वगैरे  विचारून होते.

  आता सणसवाडी आली. इतक्यात फोन वाजतो. दादांचा (वडिलांचा) फोन. त्याना मी सायकलिंग ला     गेलेय हे एव्हाना कळलेलं असतं. सोशल मीडियाची ऐशी की तैशी. मग मी थांबून गप्पा मारून      घेते. गोल्डा     मायर, इझराइलची स्थापना, जडण घडण आणि असेच इतरांना वायफळ वाटेल असे काहीही. मग मला आठवते की मी सोलो सायकलिंगला आलेय. मी तसे सांगून फोन बंद करते. सणस वाडी तून माझे मन खरे तर रांजणगाव कडे  धाव घेतेय. पण आता मन भरलंय आणि पाय भरून  येतायत.  

किती तरी वर्षांनी असा निवांत एकांत मिळाला. अंतरंगाशी दोस्ती करायला उसंत मिळाली. संवाद न साधल्या मुळे मनात निर्माण झालेले वितंड वाद मिटले.

Aimless भटकून झालं, fearless व्हिडीओ काढून झाले, चिखलाच्या रस्त्यावरून सायकल दामटवून झाली. निर्मनुष्य घाटावर स्वतःलाच सोबत करून झाली, उतारावर सुसाट सायकल हाणून झाली, तोंडावर येणा-या वारयाची स्पर्धा करून झाली. आता काही म्हणजे काही करायचं राहिलं नाही अस लक्षात आल्या वर मी निमूटपणे घरात शिरते. परत तेच शहाण आयुष्य जगायला. पण आता त्या शहाण्या आयुष्याची पर्वा नाही. माझ्या वेड्या मनाशी दोस्ती करून आलेय ना मी आज.

शुद्धी महत्वाची तनाची आणि मनाचीही............

सुधारस

सौ. सुधा गणेश सोवनी  त्यांना मी जेव्हा प्रथम भेटले तेव्हाच त्यांचा प्रेमात पडले.  आणि आमचे हे प्रेमाचे सुंदर नाते बघता बघता सव्वीस वर्षांचे...